सूक्ष्म अध्ययन क्षमता विकसित करताना
प्रवीण राहिंज
जि. प. प्राथ. शाळा माळवदे वस्ती, केंद्र-पिंपळवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर भ्रमणध्वनी : ९४०३१९२०५१
विदयार्थ्यांना शिकविताना शिक्षक जितका प्रयोगशील, सजग आणि अभ्यासू असेल तितका तो विदयार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने सक्षम बनवीत असतो. भविष्यात विदयार्थ्यांना सूक्ष्म अध्ययनाची सवय लागावी व त्यातून सूक्ष्म चिकित्सा करण्याची स्पर्धात्मक युगात शिक्षकांची क्षमता विकसित व्हावी या दृष्टीने अहमदनगरच्या पिंपळवाडी भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरत येथील शाळेत राबविलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाविषयी...
आजच्या माहिती तंत्र- ज्ञानाच्या युगात आणि दररोज नवनवीन अध्ययन-अध्यापन पद्धतींचा उगम होणाऱ्या या आली आहे. खरं तर शिक्षकाची भूमिका ही नवनवीन अध्ययन-अध्यापन पद्धती विकसित आणि अनुभवातून ती विकसित झाली तर यापेक्षा आणखी मोठे यश दुसरे कोणते असणार नाही. शिक्षकाची भूमिका ही मित्राची, मार्गदर्शकाची, सुलभकाची असणार आहे. आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यात स्वयंअध्ययनासाठी प्रेरक व पूरक परिस्थिती निर्माण करण्यात शिक्षकाचे खरे कौशल्य आहे. स्वयं- अध्ययनाच्या माध्यमातून एक चांगली अध्ययन सवय (Learning habit) विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते.
आपली अध्यापन पद्धती ही विद्यार्थिकेंद्रित असायला हवी. अध्यापन पद्धती जितकी विद्यार्थिकेंद्रित तितके विद्यार्थी अधिक ज्ञानवान होत जाणार. शिक्षक काय शिकवितो यापेक्षा विद्यार्थ्याला किती समजते आणि तो कसा शिकतो हे अधिक महत्त्वाचे आहे. विदयार्थी अध्ययन घटकाशी किती एकरूप होतो हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
ऐकलेल्या, पाहिलेल्या, शिकविलेल्या ज्ञानापेक्षा विदयार्थ्यांनी स्वतः कृती करून व स्वानुभवातून, स्वतःच्या कुवतीप्रमाणे अर्जित केलेले ज्ञान अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहणारे असते. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत स्वावलंबन आणि स्वतःचे सहभागी होणे फार महत्त्वाचे असते. स्वत:हून ज्ञान मिळविण्याची प्रेरणा निर्माण करणे आणि आपण स्वतः ज्ञानार्जन करू शकतो हा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण होणे हीच शिक्षकाची खरी कसोटी आहे, यामुळे विद्यार्थी आयुष्यभर 'विद्यार्थीच' राहून ज्ञानार्जन करतो.
मी माझ्या वर्गामध्ये वापरत असलेल्या भाषा विषयाच्या अध्यापनपूर्व कृतींविषयी आपणाशी चर्चा करणार आहे. आपल्या
जीवन शिक्षण / नोव्हेंबर २०१८
अध्ययन घटकाच्या सूक्ष्म विश्लेषणाची ही एक पद्धत आहे. या पद्धतीतून, कृतींतून विदयार्थ्यांना सूक्ष्म अध्ययनाची (Micro-learning) सवय लागते. सूक्ष्म चिकित्सा करण्याची ही
सवय विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठीची पूर्वतयारी होऊ शकते. करणाऱ्या तत्त्वज्ञांपेक्षा शिक्षकांच्या स्वतःच्या विचारमंथनातून धडा शिकविण्यापूर्वी करावयाच्या कृती :
१) विदयार्थ्यासमवेत पाठाचे प्रकटवाचन (गट- सामूहिक वाचन ) : यातून पाठाचा आशय आणि काही प्रमाणात पाठाची मध्यवर्ती संकल्पना, पात्रांचा प्राथमिक परिचय होण्यास मदत होईल. तसेच आकलनासह वाचन हा हेतू साध्य होण्यास काही प्रमाणात मदत होईल
२) जोडशब्द वाचन व त्यांचे श्रुतलेखन: पाठातील जोडशब्द शोधण्याच्या उद्देशाने विदयार्थ्यांकडून पाठाचे पुन्हा वाचन होईल. वाचलेल्या जोडशब्दांच्या श्रुतलेखनाच्या सरावाने शब्दाशी संबंधित घटनांची उजळणी होईल आणि श्रुतलेखनाचा उद्देशही साध्य होईल.
३) पाठातील विरामचिन्हांचा परिचय स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अवतरणचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरायचे हे समजते.
उदा. पाठातील प्रश्नचिन्ह असणारी वाक्ये शोधून लिहा. उद्गारवाचक चिन्ह असणारी वाक्ये शोधून लिहा. यातून पाठातील घटना व पात्रांचा संदर्भ लक्षात येतो.
उदा. ईदगाह पाठातील किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही! आज सूर्य पहा किती सुरेख दिसतोय! किती शांत, किती सुखद !
उदा. विक्रीसाठी का नाही? इथवर बोजा आणला असता का?
४) कोण कोणास म्हणाले?: यामध्ये पाठातील संवादाच्या वाक्यांचा आणि एकेरी व दुहेरी अवतरण चिन्हांतील वाक्यांचा समावेश होतो. याद्वारे पाठातील मुख्य वाक्य,
नियोजनावर भर दया, तिथेष तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते.
२७
मुख्य पात्र, उपपात्रांचा परिचय होतो. संवादाच्या वेळची परिस्थिती व घटनाक्रम समजण्यास मदत होते.
५) पाठातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद परिचय : पाठात आलेल्या शब्दांचे वर्गीकरण केल्याने व्याकरण हा घटक पुन्हा स्वतंत्रपणे शिकविण्याची गरज भासत नाही. विदयार्थी अगदी सहज आणि नकळतपणे व्याकरणासारखा रुक्ष भाग अगदी आनंदाने आत्मसात करतात. त्या निमित्ताने पुन्हा एकदा पाठाचे सूक्ष्म वाचन विदयार्थ्यांकडून केले जाते.
६) पाठातील वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, लिंग बदला, म्हणी, एकवचन अनेकवचनयुक्त शब्द शोधणे : पाठात आलेले वाक्प्रचार, म्हणी त्यांचा अर्थ हे मात्र शिक्षकांकडून सांगण्यात यावे आणि त्यांचे उपयोजन करण्यास विदयार्थ्यांना सांगावे. विद्यार्थी त्यांच्या कुवतीप्रमाणे पाठातील समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, लिंग, एकवचन, अनेकवचनयुक्त शब्द शोधण्याचा प्रयत्न करतील.
७) पाठातील पात्रांविषयी माहिती लेखन व सादरीकरण : विद्यार्थ्यांना पाठातील पात्रांविषयी स्वत:च्या शब्दांत त्यांच्या आकलनानुसार माहिती लिहिण्यास सांगावे. (पाठात अनेक पात्रे असल्यास आवडत्या पात्राविषयी लिहिण्यास सांगावे). लिहिलेल्या मजकुराचे सादरीकरण गटात किंवा वर्गातील विदयार्थ्यांसमोर करण्यास सांगावे. यातून आपणाला विद्यार्थ्यांची अभिव्यक्त होण्याची क्षमता कळेल, तसेच त्यांच्यात सभाधीटपणा येऊन त्याचे रूपांतर आत्मविश्वासात होईल. निर्भीडपणाने आपले विचार मांडण्याची सवय वाढीस लागेल.
८) पाठातील वाक्यांवर आधारित प्रश्न तयार करणे: यामध्ये पाठात आलेल्या वाक्यांवर आधारित छोटे-छोटे प्रश्न विद्यार्थी तयार करतील. उदा. 'रमजान'
महिन्याच्या तीस दिवसांनंतर ईदचा दिवस आला आहे. प्रश्न- ईदचा दिवस कधी आला आहे? ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. प्रश्न- तानसा धरण कोठे आहे?
२) ठाणे जिल्ह्यात कोणते धरण आहे? ३) शहापूर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल इतके छोटे-छोटे प्रश्न हे आपले बालमित्र बनवितात. एकेका धड्यावर विदयार्थी तब्बल १०० ते १५० सूक्ष्मातिसूक्ष्म प्रश्न काढतात. चिकित्सक
२८
स्त्री-पुरुषांमध्ये निवड नसावी, गुणे आदरावी सर्वकाळ ।
आणि जिज्ञासू पद्धतीने अधिकाधिक प्रश्न बनवितात. यातून विदयार्थ्यांच्या प्रश्ननिर्मिती कौशल्याला वाव मिळतो. त्या निमित्ताने ते पाठाचे अधिकाधिक सूक्ष्म वाचन करतात.
अशा पद्धतीने विविध कृतींच्या माध्यमातून आणि स्वयं- अध्ययन पद्धतीने आपल्या अध्यापन पद्धतीत बदल केल्यास विद्यार्थी स्वतःहून शिकतात आणि अधिकाधिक ज्ञानसंपन्न बनतात. आता शेवटी पाठातील एकच घटक शिक्षकांनी सांगण्याचा राहतो, तो म्हणजे पाठाशी संबंधित असणारे 'मूल्य' विदयार्थ्यांना समजावून सांगणे, कारण 'मूल्य' समजण्या इतपत त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावलेल्या नसतात. एव्हाना या सर्व कृती करता करता संपूर्ण पाठ त्यांना समजलेला असतो. त्यांच्या नकळत विद्यार्थी सर्व काही शिकून बसलेले असतात आणि आता जेव्हा आपण म्हणतो "मुलांनो चला आपण आता हा पाठ / धडा शिकू या''. तेव्हा आपसूकच मुलांच्या तोंडून येते "सर आम्हांला सगळा धडा समजलाय, आम्हांला त्यातील सगळं येतंय." हे सांगताना मुलांच्या चेहन्यावरील आनंद पाहिल्यावर शिक्षकाच्या उभ्या आयुष्यातील समाधानाचा क्षण त्याहून दुसरा कोणताच असणार नाही हे वाटल्यावाचून राहत नाही. या पद्धतीने खऱ्या अर्थाने मुले स्वयं-अध्ययनातून शिकलेली असतात; ते कधीही न विसरण्यासाठी. त्यांनी स्वतः त्यांच्या ज्ञानाची निर्मिती केलेली असते. ज्ञानात वाढ केलेली असते. या सर्व क्रियांतून निर्माण झालेला आत्मविश्वास भविष्यात त्यांच्या पंखांना उभारी दिल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकेच खरे.
सुरुवातीला आपल्याला वाटते की एवढी मोठी कृतींची ! यादी कधी पूर्ण होणार? अभ्यासक्रम पूर्ण होईल का ? एकाच विषयाला एवढा वेळ दयायला कसे जमणार ? शक्य आहे का ? या सर्व प्रश्नांना माझे तेच उत्तर आहे की, हे शिकवायचं नाहीच. फक्त मुलांकडून या कृती करून घ्यायच्या आहेत. निश्चितच सुरुवातीला हे समजून घेण्यात एक-दोन दिवस जातील. जाऊ दया. मात्र विद्यार्थ्यांच्यात आम्ही स्वतःहून शिकू शकतो हा आत्मविश्वास जर यातून वाढीस लागणार असेल, तर यापेक्षा आणखी वेगळे आपले ध्येय असूच शकत नाही असे मला वाटते. सुरुवातीला या कृतींपैकी एक, दोन, तीन अशा टप्प्या-टप्प्याने वाढवीत गेल्यास मुलांनाही ते अधिक आनंददायी वाटेल आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना या कृती करण्याची आवड लावणे होय. एकदा का मुलांना या कृती करण्याची आवड लागली की मुले स्वत:हून या कृती करतील आणि स्वयं-अध्ययनाच्या पद्धतीतून स्वतःहून शिकतील.
जीवन शिक्षण / नोव्हेंबर २०१८
No comments:
Post a Comment